adsense

Tukaram Mundhe Biography in Marathi - तुकाराम मुंढे (IAS)

तुकाराम मुंढे (IAS)

  • उंची इंच: ५ '७ ",. सेंटीमीटर: १७० सेमी.                           
  • वजन किलोग्राम: ६८ कि.ग्रा. , पाउंड: १४९ एलबीएस.       
  • बाइसेप्सचा आकार: १३ इंच.                                          
  • शरीराचे मापन (chest-waist-hips): ३८-३६-३५.         

Tukaram Mundhe Biography in Marathi


              बीड जिल्ह्यात ताडसोना या लहानशा गावात तुकाराम मुंढे यांचा जन्म ३ जून १९७५ ला झाला. त्यांनी व त्यांच्या भावंडांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. तुकाराम मुंढे यांना घरच्या संस्कारात प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम हरिभाऊ मुंढे आहे. मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते. 

      त्यांनी १९९६ मध्ये आपले उच्चशिक्षण शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (डॉ.बाबासाहेब अंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र मधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, वर्ष १९९८ मध्ये राज्यशास्त्र (पॉलिटिकल सायन्स) घेऊन डॉ. बाबासाहेब अंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून एमए पूर्ण केलं. त्यांनी त्यांच्या मैत्रिणी सोबत लग्न केले आणि त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांना पुस्तके वाचण्याचा छंद आहे आणि साउथ इंडियन (फूड डिशेस) जेवण त्यांना खूप आवडतो.


Tukaram Mundhe Biography in Marathi
Tukaram Mundhe Mahiti

              शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ असल्याने ते दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम करत होते. त्यानंतर मे २००५ ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. विशेष म्हणजे ते देशात २० वे आले होते आणि तेथून त्यांचा हा बेडर प्रवास सुरु झाला. तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. २००८ साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची Chief executive officer म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. त्यांनी दुसऱ्या दिवशी  त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून १०-१२ टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता कामचुकारपणा पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. Chief executive officer ने इतिहासात पहील्यांदाच डाॅक्टरला निलंबित केले होते.

                 २००९ साली नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे २०१० ला मुंबईला KVIC ला Chief executive officer म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जिथे जेल तिथे आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी पुरवण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी ते तीन महीन्यात करून दाखवले व जालनाकरांची तहान भागवली.

                     पुढे २०११-१२ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर २०१२ साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात १४३ कोटी रूपयांचा महसूल ५०० कोटीवर गेला. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील २८२ गाव घेतले. या गावातील कामे त्यांनी फक्त १५० कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान ५०-६० कोटींचे होते. वर्षाला ४०० टँकर लागणार्‍या सोलापूरात टँकरची संख्या ३०-४० वर आली. 

सोलापूर मध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण १४-१५ लाख लोकं यावेळी वारीला हजेरी लावतात. त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते. परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या २१ दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी ३ हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी मुख्यमंत्री वगळता इतर VIP दर्शन त्यांनी बंद केले.

                  नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना त्यांनी दर रविवारी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी “वॉक विथ कमिशनर” कार्यक्रम सुरू केला आहे. हा Walk With Commissioner चा कार्यक्रम जनतेत चांगलाच गाजला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबई मधील वाहतुकीची अडचण ओळखता, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला ज्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा,पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.

     पुणे महानगरपालिकेच्या PMPML चे अध्यक्ष असताना महीन्याला PMPML ची ६ लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या ९ लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. एएफसीएस यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केंव्हाही या तिकीटींग यंत्रणेवर नियंत्रण आणि निरिक्षण करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये ४० टक्के वरून शंभर टक्के अशी वाढ गेल्या तीन महिन्यात झाली आहे.

Tukaram Mundhe Biography in Marathi
Tukaram Mundhe Information in Marathi


     मात्र, त्यांच्या या प्रामाणिक आणि बेडर कामामुळे कॉंग्रेस, भाजपसह शिवसेनेना त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव संमत करतात. त्यांच्या निर्भीड कामगिरीमुळे आपल्या १२ वर्षांच्या सेवकाळात त्यांची ११ वेळा बदली झाली आहे. तथापि, ते म्हणतात आमची यंत्रणा प्रामाणिक अधिकार्‍यांना योग्य प्रकारे काम करण्यास समर्थन देत नाही.

       अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे, प्रामाणिक, बेडर आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास सलाम...


     तुकाराम मुंढे सरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडला असल्यास नक्की शेअर करा...

 ✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳