adsense

धीरूभाई अंबानी यांचे जीवनप्रवास - Dhirubhai Ambani Biography in Marathi

धीरूभाई अंबानी 

      धीरूभाई अंबानी हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती होते. धीरजलाल हिरालाल अंबानी यांनी 1966 मध्ये रिलायन्स टेक्सटाईलची स्थापना केली. धीरू भाई अंबानी यांनी सुरुवातीला 300 रुपयाच्या पगारावर काम केले, परंतु जीवनाच्या शेवटच्या क्षणी त्यांची संपत्ती त्यावेळी 62 हजार कोटींपेक्षा जास्त होती. त्यांच्या मते “मोठे स्वप्न पहा कारण मोठ्या स्वप्न पाहणाऱ्यांचीच स्वप्ने खरी ठरतात”. धीरूभाई हे केवळ भारतातच नव्हे तर जगातील प्रेरणादायक व्यक्तींपैकी एक होते. धीरूभाईंनी घेतलेले परिश्रम, प्रामाणिकपणा आणि समर्पणामुळे भारताचा प्रत्येक तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेत असतो. Dhirubhai Ambani Information in Marathi

Dhirubhai Ambani Biography in Marathi
Dhirubhai Ambani Mahiti


◆ सुरुवातीचे जीवन

     धीरजलाल हिरालाल अंबानी यांचा जन्म गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील चोरवाड या छोट्या गावात 28 डिसेंबर 1932 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव हिरालाल अंबानी आणि आईचे नाव जमनाबेन होते. धीरूभाई अंबानी यांचे वडील शिक्षक होते. धीरूभाईनां चार भावंडे होती. 

    एवढ्या मोठ्या कुटुंबामुळे त्यांच्या परिवाराला आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले. धीरूभाई यांचे सुरुवातीचे जीवन खूप कष्टमय गेले. या सर्व समस्यांमुळे त्यांना शालेय शिक्षण मध्यभागीच सोडावे लागले. आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण घेऊन धीरूभाई कुटूंबाच्या मदतीसाठी किरकोळ कामे करू लागले.

◆ व्यवसायात अपयश

      धीरूभाईंनी शिक्षण सोडल्यानंतर फळे आणि फराळाची विक्री करण्यास सुरवात केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याने गावाजवळील धार्मिक ठिकाणी पकौड़े विकणे सुरू केले, परंतु हे काम संपूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून असल्याने वर्षाच्या विशिष्ट वेळी चांगला धंदा होत तर इतर वेळी फारसा होत नसे. धीरूभाई अंबानी यांनी हे काम काही काळानंतर थांबविले. पहिल्या दोन व्यवसायात अयशस्वी झाल्यानंतर धीरूभाईच्या वडिलांनी त्यांना नोकरीचा सल्ला दिला.

◆ नोकरी 

      धीरू भाई अंबानी यांचा मोठा भाऊ येमेनमध्ये नोकरी करायचा. त्याच्या मदतीने धीरू भाईला येमेनला जाण्याची संधीही मिळाली. तेथे त्याने पेट्रोल पंपवर महिन्याला 300 रुपये पगारावर काम केले. अवघ्या दोन वर्षात त्यांच्यातील पात्रतेमुळे ते व्यवस्थापकपदावर पोहोचले. नोकरी करत असताना सुद्धा त्यांचे मन व्यवसायात गुंतले होते. धीरूभाईंनी एक यशस्वी व्यवसायिक कसा बनता येईल या करीता प्रत्येक शक्यतांचा विचार केला. 

        या एका घटनेमुळे त्यांच्यातील असलेली व्यवसाया बद्दलची आवड लक्षात येते - जेव्हा धीरूभाई अंबानी एका कंपनीत काम करत होते, तेव्हा तिथे काम करणारे कामगार फक्त 25 पैशात चहा घेत असत, परंतु धीरू भाई जवळच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जात असत जिथे चहासाठी 1 रुपया द्यावे लागत होते. जेव्हा त्यांना यामागचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मोठे व्यापारी हे मोठ्या हॉटेल्समध्ये येतात आणि व्यवसायाबद्दल बोलतात. मी त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी जात असतो जेणेकरुन मला व्यवसायाबद्दल बारकाईने समजू शकेल. यावरून धीरूभाई अंबानी यांना व्यवसायाबद्दल किती उत्कट इच्छा होती हे दिसून येते.

◆ व्यावसायिक कारकीर्द

      काही काळानंतर, येमेनमध्ये स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरू झाली, ज्यामुळे व्यवसायाचे सर्व दरवाजे तिथे राहणा भारतीयांसाठी बंद झाले. त्यानंतर 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला धीरूभाई अंबानी हे येमेनहून भारतात परतले. त्यांनी व त्यांचा चुलत भाऊ चंपकलाल दमानी मिळून पॉलिस्टर धाग्यांचा आणि मसाल्यांचा आयात-निर्यतीचा व्यवसाय सुरू केला. रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनने मस्जिद बंदरमधील नरसिंह स्ट्रीटवरील एका छोट्याशा कार्यालयापासून सुरुवात केली. येथूनच रिलायन्स कंपनीचा जन्म झाला. या व्यापारामागील धीरूभाईंचे ध्येय म्हणजे जास्तीत जास्त उत्पादने तयार करणे आणि नफ्यावर लक्ष न देणे हे होते. यावेळी, अंबानी आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील भुलेश्वरच्या 'जय हिंद इस्टेट' मधील एका लहान अपार्टमेंटमध्ये राहत होते.

       1965 मध्ये धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांची व्यावसायिक भागीदारी संपुष्टात आली. स्वभाव आणि व्यवसाय करण्याचा मार्ग दोघांचाही पूर्णपणे भिन्न होते, म्हणून ही भागीदारी फार काळ टिकली नाही. दमानी सावध व्यवसाय करणारे तर धीरूभाई जोखीम घेणारे मानले जात होते. यानंतर, धीरूभाईंनी कापूस व्यापारात हातमिळवणी केली यात जास्त तोटा होण्याची भीती होती. पण ते ठाम होते, एका छोट्या दुकानात हा व्यवसाय सुरू केला आणि लवकरच धीरूभाई त्यांच्या कर्तृत्वामुळे बॉम्बे कॉटन ट्रेडर्स ऑर्गनायझेशनचे संचालक झाले.

       आतापर्यंत धीरूभाईंना वस्त्रोद्योगाचा चांगलाच आकलन होता. या व्यवसायात चांगल्या संधींची जाणीव असल्यामुळे त्यांनी 1966 मध्ये अहमदाबादच्या नैरो येथे टेक्सटाईल गिरणी स्थापन केली. येथे वस्त्रोद्योगात पॉलिस्टर धाग्यांचा वापर केला जात असे. धीरूभाईंनी विमल हा ब्रँड बाजारात आणला जो त्यांचा मोठा भाऊ रमणिकलाल अंबानी यांचा मुलगा विमल अंबानी याच्या नावावर आहे. त्यांनी "विमल" या ब्रँडची इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिरात केली की भारताच्या ग्रामीण भागातही हा ब्रँड घरगुती नाव बनला.

    1980 च्या दशकात पॉलिस्टर फिलामेंट सूत तयार करण्यासाठी सरकारी परवाना मिळविण्यात धीरूभाईंना यश आले. यानंतर धीरूभाई यशाची शिडी चढत राहिले. इक्विटी कल्ट भारतात सुरू करण्याचे श्रेयही धीरूभाईंना जाते. 1977 मध्ये रिलायन्सने आयपीओ जारी केला तेव्हा 58,000 हून अधिक गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली. गुजरात आणि इतर राज्यातील ग्रामीण भागातील लोकांना याची खात्री देण्यात धीरूभाई यशस्वी ठरले की जो कोणी आपल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करेल त्याला केवळ त्याच्या गुंतवणूकीवर नफा मिळेल. 

      त्यांच्या हयातीत धीरूभाईंनी रिलायन्सचा व्यवसाय विविध क्षेत्रात विस्तारित केला. यात प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, वीज, किरकोळ, वस्त्रोद्योग, पायाभूत सेवा, भांडवली बाजार आणि रसद यांचा समावेश आहे. 1999 नंतर मुक्त अर्थव्यवस्थेमुळे तयार झालेल्या नव्या संधींचा पुरेपूर उपयोग करून धीरूभाईचे दोन्ही पुत्र यशस्वीरित्या 'रिलायन्स' च्या पिढीचे नेतृत्व करीत आहेत.

 ◆ वयक्तिक जीवन

     धीरूभाई अंबानी यांचे लग्न कोकिलाबेनशी झाले होते आणि त्यांना दोन मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी आणि दोन मुली निना कोठारी आणि दीप्ती साळगावकर आहेत.

◆ मृत्यू

       हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर, धीरूभाई यांना 24 जून 2002 रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याआधीही 1986 मध्ये एकदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्याच्या उजव्या हाताला अर्धांगवायू झाला. 6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांनी अखेरचा श्वास घेतला.

◆ धीरूभाई अंबानी यांचे प्रेरणादायी विचार

Dhirubhai Ambani Quotes


माझ्या यशाचे रहस्य म्हणजे माझी महत्वाकांक्षा आणि इतर लोकांचे मन जाणून घेणे 

योग्य उद्योजक जोखीम घेण्यामुळे जन्माला येतात

संकटातही आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करा. अडचणींना संधींमध्ये रुपांतर करा. शेवटी तुम्हाला यश मिळेल.

मोठा विचार करा , वेगाने करा , पुढचा विचार करा. कल्पनांवर कोणाचीही मक्तेदारी नाही 

तुम्ही दृढनिश्चय आणि परिपूर्णतेने काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल

आम्हा भारतीयांची समस्या ही आहे की आपण मोठे विचार करण्याची सवय गमावली आहे. 

नवीन उद्योजकांचे यश हे नव्या शतकात भारतात बदल घडवून आणू शकते

संधी तुमच्या सभोवताल आहेत, त्यांना ओळखून त्यांचा फायदा घ्या.

बहुतेक लोकांना असे वाटते की संधी मिळणे भाग्यावर अवलंबून असते. माझा विश्वास आहे की संधी आपल्या सभोवताली आहेत.

माझा विश्वास आहे की सर्व काही पैशांनी करता येत नाही, हा सर्वत्र माझा अनुभव आहे

जर आपण आपल्या स्वप्नाचा पाठलाग केला नाही तर कोणी तरी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामाला ठेवेल


    धीरूभाई अंबानी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आवडला असल्यास नक्की शेअर करा…

✒️ आपल्या भाषेत मराठी भाषेत 🇮🇳